*सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा जिवती शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली*(हिंदुस्तान न्यूज 24: रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर आमदार, देवराव भोंगळे)चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.जिवती -जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्य दलाचे आभार व अभिनंदन करण्यासाठी काल दि. २३ मे रोजी जिवती शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिवती तालुक्यातील देशभक्त नागरिक, विविध प्रशासकीय अधिकारी, तरुण, विद्यार्थी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारत माता की जय आणि हम सेना के साथ हैं अशा जयघोषात निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरली.पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचे हे भ्याड कृत्य अत्यंत निंदनीय आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. पाकिस्तानला अशा भ्याड हल्ल्यांनी भारताला कधीही झुकवता येणार नाही. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करत ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाशी संबंधित अनेक महत्त्वाचे दहशतवादी ठार झाले, ज्यात मौलाना युसूफ अझहर सारख्या प्रमुख दहशतवाद्याचाही खात्मा झाला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दहशतवादाच्या विरोधात घेतलेल्या संकल्पाशी जनता ठामपणे उभी असल्याचे या रॅलीने दाखवून दिले आहे असेही यावेळी आवर्जून म्हटले. या रॅलीमुळे जिवती शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. दहशतवादाविरोधात एकत्र उभे राहण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.या रॅलीत माझ्यासमवेत भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, नायब तहसीलदार शील, पोलीस उपनिरीक्षक श्री. वाडेवा, वन विभागाचे श्री. करकाडे, गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्निल टेंबे, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे श्री. दुधे, केशव गिरमजी, राजेश राठोड, गोविंद टोकरे, सुनील मडावी, गोपीनाथ चव्हाण, पुरुषोत्तम भोंगळे, बापुराव मडावी, अंबादास कंचकटले, दिगांबर आंबटवाड,आनंद कदम, पुंडलिक गिरमाजी, भिमराव पवार, संतोष जाधव, पुष्पा सोयम, चेतना राठोड, सुबोध चिकटे, बालाजी माने, सांबा शिंदे, संग्राम बाजगीर, बालाजी बिरजदार, साहेबराव राठोड,राज बेल्लाळे, रामेश्वर सबुचे, टिकाराम राठोड, गोवर्धन चव्हाण,संतोष राठोड, उखंडराव चव्हाण, मोकिंद राठोड, कमलाकर जाधव,संभाजी रायवाड, बाळू ठोंबरे, रवी जेवले, कपिल राठोड, विकास सोनकांबळे, शिवाजी बोइनवाड, राहुल राठोड आदिंसह जिवतीकरांची मोठी उपस्थिती होती.

*पवित्र  दिक्षाभूमी चा विकास भव्य व जागतिक दर्जाचा व्हावा – आ. किशोर जोरगेवार.*

*दिक्षाभूमीच्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक.*हिंदुस्तान न्यूज 24: रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर 



 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र चरणस्पर्शाने पावन झालेल्या दिक्षाभूमीचा जागतिक पातळीवर विकास करण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. त्यांच्या प्रयत्नातून या पवित्र स्थळाच्या विकासासाठी ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातील जवळपास १४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या कामांना गती देण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.
दिक्षाभूमीच्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात बैठक बोलावली होती. सदर बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, समाजकल्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद माहुतुरे, समाज कल्यान विभागाच्या स्मिता बैहीरमवार, सार्वजनिक विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, दिक्षाभुमी ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, कुणाल घोटेकर, राहुल घोटेकर, प्राचार्य दहेगावकर, निवृत्त प्रा संजय बेले, भारतीय जनता पक्षाचे माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, भाजप नेते प्रकाश देवतळे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, मनोज पाल, रवी गुरुनुले, रंजन ठाकूर, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिक्षाभूमीच्या विकासकामाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली आणि सर्व प्रक्रिया जलद पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पवित्र स्थळाचा विकास नेटका व भव्य व्हावा, यासाठी सर्व विभागांनी आपसात समन्वय साधावा. निधीचा योग्य वापर होईल याची काळजी घ्या, असे ते यावेळी म्हणाले. दिक्षाभूमीच्या विकासासाठी मागील अनेक वर्षांपासून आपण प्रयत्नशील होतो. आता निधी मंजूर झाल्यामुळे जागतिक पातळीवर या पवित्र स्थळाचा विकास होईल. दिक्षाभूमी हे जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे पवित्र स्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती जपण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या ठिकाणाचा विकास अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच मागील अनेक वर्षांपासून आपण या विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. या निधीतून सभागृह, पथदिवे, उद्यान, पाणीपुरवठा, शौचालय सुविधा, सुरक्षा यंत्रणा, स्थापत्यशास्त्रीय सौंदर्यवृद्धी आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे दिक्षाभूमीचा विकास भव्य स्वरूपात होणार आहे. सर्व विभागांनी आपसात समन्वय साधावा.निधीचा प्रत्येक रुपया योग्य कामासाठीच वापरला गेला पाहिजे. कोणत्याही अडथळ्यामुळे विकासकामांना विलंब होऊ देऊ नका, काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे. या पवित्र भूमीचा जागतिक दर्जाचा विकास व्हावा, हा आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे. आपण सर्वांनी प्रामाणिकपणे आणि एकजुटीने काम करावे, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या बैठकीत विकासकामांची रूपरेषा, निधी वितरण प्रक्रिया, निविदा प्रक्रिया आणि वेळापत्रक याबद्दल सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रशासनाने कामांना गती देण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे दिक्षाभूमीच्या विकासकामांना नवा वेग मिळणार आहे. लवकरच हे पवित्र स्थान जागतिक स्तरावर नव्या स्वरूपात ओळखले जाईल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments